आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

नसरापूर गणात पंचायत समिती निवडणुकीत परिवर्तनाची चाहूल जनतेचा निर्धार — फक्त सचिन अण्णा बांदल


नसरापूर–वेळू गटातील नसरापूर गणात पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या परिवर्तनाची ठळक चाहूल लागलेली दिसत आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या गटात यंदा अनेक मातब्बर, प्रस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार रिंगणात उतरले असले, तरी जनतेची नजर मात्र एका वेगळ्याच नेतृत्वाकडे वळलेली आहे. ते नेतृत्व म्हणजे तळागाळातून, कष्टकरी शेतकरी वर्गातून पुढे आलेले सचिन अण्णा बांदल.

 

नसरापूर गणातील जनमताचा सूर पाहता, ही निवडणूक केवळ पक्षीय किंवा व्यक्तिकेंद्रित न राहता विचार आणि विश्वासाची बनत चालली आहे. सचिन अण्णा बांदल यांचा प्रवास हा संघर्षातून घडलेला आहे. शेतीत राबणाऱ्या कुटुंबातून पुढे येत, अपार कष्टांच्या बळावर त्यांनी स्वतःचा उद्योग उभा केला. मात्र आर्थिक स्थैर्य मिळाल्यानंतरही त्यांनी समाजापासून अंतर ठेवले नाही. उलट, सामान्य माणसाच्या दुःखाशी स्वतःला जोडून घेत त्यांनी सेवा हाच जीवनमार्ग मानला.

 

गरिबांची मदत, गरजूंसाठी तत्काळ धावून जाणे, आजारपण, शिक्षण, सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग—या सर्व गोष्टींमुळे सचिन अण्णा बांदल हे नाव नसरापूर गणातील प्रत्येक गावात विश्वासाचे प्रतीक ठरले आहे. वारकरी संप्रदायाशी असलेली नाळ, शिव–शाहू–फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवरची ठाम श्रद्धा आणि कोणताही भेद न ठेवता माणुसकी जपण्याची भूमिका, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक पैलू मानले जातात.

 

या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उभाटा गट) पक्षाचे नसरापूर गणातील अधिकृत उमेदवार म्हणून सचिन अण्णा बांदल यांचे नाव पुढे आले असून, त्याला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मोठ्या ताकदीच्या आणि प्रस्थापित उमेदवारांच्या उपस्थितीतही जनतेचा कल स्पष्टपणे “आपल्यातीलच माणूस” या भूमिकेकडे झुकलेला आहे.

 

नसरापूर गणातील शेतकरी, युवक, महिला, वारकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सध्या एकच चर्चा आहे—पंचायत समितीत असा प्रतिनिधी हवा, जो सत्तेसाठी नव्हे तर सेवेकरिता उभा आहे. ही भावना आज सचिन अण्णा बांदल यांच्या रूपाने व्यक्त होताना दिसते.

 

म्हणूनच, नसरापूर–वेळू गटातील नसरापूर गणात यंदाची पंचायत समिती निवडणूक ही केवळ राजकीय लढत न राहता जनतेच्या अपेक्षा, विश्वास आणि परिवर्तनाचा कौल ठरण्याची चिन्हे आहेत.

आज जनतेचा निर्धार स्पष्ट आहे—

 

पंचायत समितीला नसरापूर गणातून फक्त आणि फक्त सचिन अण्णा बांदल.

 

हा निर्धारच उद्याच्या नेतृत्वाचा पाया ठरणार आहे.


  • 👍
102
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!